मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे गट आणि भाजप यांचे एकत्रित सरकार स्थापन झाले. त्यानंतर अनेक नेत्यांनी याविषयी आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यातच आता शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कुठे लिंबू फिरवलं आणि कुठल्या भक्ताकडे गेले माहीत नाही”, असे खळबळजनक वक्तव्य भरत गोगावले यांनी केले आहे.
रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. गोगावले यांच्या विधानामुळे आता पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. भाजपासोबत युती तुटल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँगेस आणि काँग्रेससोबत युती करत राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले होते. या सरकारच्या काळात शिवसेनेच्या आमदारांना दुजाभाव मिळत असल्याची तक्रार अनेकदा गोगावलेंनी उद्धव ठाकरेंकडे केली होती. अखेर एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी करत भाजपासोबत युती केली आणि राज्यात नवे सरकार स्थापन केले. मात्र, शिवसेनेने भाजपासोबत युती केली असती तर पाच पावले मागे आलो असतो असेही गोगावले यांनी
राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने भरत गोगावले नाराज असल्याची चर्चा होती. परंतु, आपण नाराज नसल्याचे म्हणत गोगावले यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. या मंत्रीमंडळ विस्तारात रायगडच्या एकाही आमदाराला स्थान मिळाले नसल्यामुळे रायगडात नाराजीचा सूर होता. परंतु, गोगावले यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत आपण नाराज नसल्याचे सांगितले आहे.