संजय भागवत; ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर
सातारा (प्रतिनिधी) – करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता ग्रामीण भागात क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांची भरारी पथके नेमून करोना प्रतिबंधावर भर देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी याकामी पुढाकार घेतला आहे.
सातारा जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. ग्रामीण स्तरावर गाव कृती समित्या कार्यरत आहेत. गावाबाहेरुन येणाऱ्या व्यक्तींचे होम क्वारंटाईन किंवा संस्थात्मक विलगीकरण करणे, विलगीकरणातील व्यक्ती तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाई करणे आदी कामे या समितीमार्फत करण्यात येत आहेत. या आठवड्यात विशेषत: ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग वाढू लागल्याने सध्यस्थितीत राबवण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांची भरारी पथके नेमून करोना प्रतिबंधक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. पंचायत समितीच्या अखत्यारितील क्षेत्रीय, पर्यवेक्षीय अधिकारी, कर्मचारी यांचे पंचायत समिती गणनिहाय पथक नेमण्यात येणार आहे. या पथकाचे प्रमुख म्हणून शाखा अभियंता, कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत, एनआरएचएम, कृषी, शिक्षण, पशुसंवर्धन) यापैकी एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात येणार आहे. भरारी पथकातील सदस्य म्हणून प्रत्येक पथकामध्ये दोन प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. भरारी पथक ज्या ज्या गावात जाईल त्याठिकाणी ग्रामसेवक सहकार्य करणार आहेत. हे पथक ग्राम राबवत असलेल्या उपाययोजनांची शहानिशा करणार आहे. त्रुटी, उणीवा आढळल्यास गटविकास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहेत.
विनामास्क आढळणाऱ्यांवर या पथकाच्या मार्फत 500 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर एक हजार रुपयं दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दिवसभरात केलेल्या दंडात्मक कारवाईची माहिती भरारी पथक प्रमुखांनी गुगल लिंकवर भरुन गटविकास अधिकाऱ्यांना सादर करायची आहे. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांमार्फत ही माहिती जिल्हास्तरावर संकलित होणार आहे. जिल्हा स्तरावर आले सरकार सेवा केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक, सहाय्यक जिल्हा व्यवस्थापक यांनी तालुकास्तरावरुन प्राप्त झालेली माहिती संकलित करुन तारीखनिहाय अहवाल गुगल लिंकवर भरायचा आहे.
ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना र् िीींरींरीर2।ूरहे.लो व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लशिूीं।सारळश्र.लो या इमेलवर सादर करावा. या कामात हलगर्जीपणा, टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्यावर संबंधितांवर आपत्ती निवारण कायद्यान्वये कारवाई करण्याचा इशारा संजय भागवत यांनी दिला आहे.