भंडारा – मित्रांसोबत बंधाऱ्यावर पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लाखनी तालुक्यातील चाना येथे घडली. आदित्य विजय वाघाये (वय 17) असे बुडून मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. आदित्य स्व. निर्धरराव पाटील वाघाये कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. ते अकरावीच्या वर्गात शिकत होता.
आदित्य मित्रांसोबत चाना शेत शिवाराच्या बंधाऱ्यावर पोहोण्यासाठी गेला होता. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गेला आणि बुडाला. ही बाबा मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने आदित्यच्या कुटुंबियांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनाही माहिती देऊन ग्रामस्थांच्या मदतीने आदित्यचा शोध घेणात येत आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शोधकार्यात अडचणी येत आहेत. मृतदेह सापडलेला नसून अद्याप शोधकार्य सरु असल्याची माहिती लाखनी पोलिसांनी दिली.