उंब्रज – सवंग लोकप्रियतेसाठी मोठमोठ्या घोषणा करून, निवडणुकीच्या तोंडावर लोकांच्या भावनांशी खेळत त्यांची फसवणूक केली जाते. अशा प्रवृत्तीच्या लोकांपासून सावध रहा, असे आवाहन बाळासाहेब पाटील यांनी केले.
चरेगाव ता. कराड येथे आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. देवराज पाटील, संपतराव जाधव, हेमंत जाधव, सुरेखा जाधव, भास्करराव गोरे, महेश पाटील, संजय थोरात, शहाजीराव चव्हाण, राजेंद्र भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
बाळासाहेब पाटील म्हणाले, विकास ही न थांबणारी संकल्पना असून कराड उत्तर मतदार संघाचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. हे शेतकऱ्याच्या विरोधी सरकार आहे. गेल्या पाच वर्षात सत्तेत राहणाऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्राला काय दिले याचा लेखाजोखा मागण्याची गरज आहे.प्रास्ताविक सुरेश पुजारी यांनी केले. आभार संजय माने यांनी मानले.