कोडरमा – पहिल्यांदा मतदान करणाऱ्या नवमतदारांनी महामिलावटी लोकांपासून सावध राहावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथील प्रचारसभेत बोलताना केले. ते म्हणाले की केंद्रात पुर्ण बहुमताचे सरकार येऊ नये यासाठी विरोधकांची ही आघाडी प्रयत्नशील आहे असेही त्यांनी नमूद केले. केंद्रात दुबळे सरकार सत्तेवर यावे आणि त्यावर रिमोट कंट्रोलने आपले नियंत्रण राहावे असा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे असे ते म्हणाले.
विरोधकांची ही महामिलावट कोणत्याही जबाबदारीशिवाय सत्ता संपादन करू इच्छिते त्यातून देशाचे नुकसानच होणार आहे असे नमूद करून मोदी म्हणाले की त्यांना देशहितापेक्षा केवळ मतांचीच चिंता आधिक आहे. त्यांना आपल्या भागाच विकास करण्यातही स्वारस्य नाही. आपल्या भागात वोट बॅंक तयार करणे हेच त्यांचे एकमेव उद्दीष्ठ असते अशी टीकाहीं त्यांनी केली.