मुंबई – राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या 14 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई (कांजूरमार्ग-1, घाटकोपर-1) -2, पालघर -1, रायगड- महाड- 2, ठाणे-2, रत्नागिरी-चिपळूण-2, कोल्हापूर-2, सातारा-1, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) एकूण 12 पथके तैनात आहेत. नांदेड- 1, गडचिरोली 1 अशी एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) तुकड्या तैनात केलेल्या आहेत.
राज्यात एक जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे 28 जिल्हे व 316 गावे प्रभावित झाली आहेत.राज्यात विविध ठिकाणी 83 तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली असून 14 हजार 480 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
अतिवृष्टीमुळे 119 नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. तर 232 प्राणी दगावले आहेत. 44 घरांचे पूर्णत: तर 2 हजार 086 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.