कोलकाता – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत बंगाल संघाने कर्नाटकचा पराभव करत 13 वर्षांनंतर अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य लढतीत बंगालने कर्नाटकचा 174 धावांनी पराभव केला. या पूर्वी 2007 साली बंगालने अंतिम फेरी गाठली होती मात्र त्यांना मुंबईकडून पराभव पत्करावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
We take a look at the top moments as Bengal enter the @paytm #RanjiTrophy 2019-20 final with a win over Karnataka. ??
Full video ?? https://t.co/kpxcSs1XWF#BENvKAR pic.twitter.com/jKKKsctfLG
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 3, 2020
पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करताना बंगालने 312 धावा उभारल्या. लोकेश राहुलला अपयश आल्याने कर्नाटकचा पहिला डाव 122 धावांवर संपला. दुसऱ्या डावात बंगालच्या फलंदाजांना अपयश आले व त्यांचा डाव 161 धावांवर संपला.
कर्नाटकसमोर विजयासाठी 352 धावा करण्याचे आव्हान होते. कर्नाटकचा दुसरा डाव 177 धावांवर संपला व बंगालने 174 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.