मधुमेह झाला असता शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी बेलाची पाने आणि काळी मिरी 2:1 प्रमाणात घेऊन चांगले चूर्ण करावे. शक्यतो बेलाची पाने वाळवून घ्यावीत. काळीमिरी आणि बिल्वपत्राचे चूर्ण एकत्र मिसळून रोज कोमट पाण्यात अर्धा चमचा घ्यावे. याचा लाभ मधुमेहींना होतो. त्यांचे साखरेचे प्रमाण योग्य राहाते.
अजीर्ण झाले असता बेलाच्या कोवळ्या पानांचा रस किंचित मिरीपावडर व सैंधव एकत्र करून चाटावे यामुळे अन्नपचन होते. दोन-तीन वेळा असे मिश्रण जिभेवर ठेवले असता अजीर्ण होत नाही.
लघवीची जळजळ कमी होण्यासाठी बेलाच्या पानांबरोबर जिरे कुटावीत आणि हे मिश्रण घ्यावे किंवा बेलपत्राच्या रसाची भावना देऊन जिरे पावडरमध्ये बनविलेल्या गोळ्या लघवीची जळजळ थांबवतात.
अशाप्रकारे बेलाचे झाड हे पंचांगानी उपयुक्त आहे फक्त त्याचा औषधी वापर योग्य पद्धतीने करावा. खूप रक्तस्राव होत असेल, खूप ताप आला असेल, भूक मंदावली असेल, बद्धकोष्टता या सर्वांवर बेल उपयुक्त आहेच, पण गर्भाशय शोधनाचे कामही बेल करते.
म्हणूनच आपल्या आहारात बेलाचा उपयोग करा. बेलाचे सरबत किंवा बेलफळाचा मुरांबा यांचा समावेश करावा बेलफळाचा मुरांबा घेतल्याने
शौचाला साफ होते. तसेच हागवण बरी होते. अशा प्रकारे बेल, बेलाचे पान, फळ, मूळ, खोड… सर्वच भाग उपयुक्त आणि आणि आरोग्यदायी आहेत.