नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यास केवळ एकच दिवस राहिला आहे. परंतु, त्याआधी विरोधकांनी ईव्हीएम मशीनच्या छेडछाडीवरून रान उठविले आहे. यातच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना आत्मविश्वास ठेवण्यास सांगितले आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे की,’पुढील २४ तास फार महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही सावध रहा, ईव्हीएम मशीनच्या छेडछाडीवरून तुम्ही निराश होऊ नका. तुम्ही स्वतःवर आणि काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवा. तुमची मेहनत व्यर्थ नाही जाणार.’
कांग्रेस पार्टी के प्रिय कार्यकर्ताओं,
अगले 24 घंटे महत्वपूर्ण हैं। सतर्क और चौकन्ना रहें। डरे नहीं। आप सत्य के लिए लड़ रहे हैं । फर्जी एग्जिट पोल के दुष्प्रचार से निराश न हो। खुद पर और कांग्रेस पार्टी पर विश्वास रखें, आपकी मेहनत बेकार नहीं जाएगी।
जय हिन्द।
राहुल गांधी
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 22, 2019