बंगलुरू – महाराष्ट्राबरोबर असलेला सीमा प्रश्न व बेलगावीचा विषय आता संपलेला आहे. त्याविषयी कोणताही वाद नसताना केवळ राजकारणासाठी महाराष्ट्रातील काही राजकीय पक्ष हा विषय सातत्याने उपस्थित करीत आहेत असा आरोप कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथनारायणन यांनी केला आहे.लोकांना भडकावण्यापेक्षा सार्वजनिक हिताच्या बाबींकडे आता लक्ष द्या असेही त्यांनी सुचवले आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमा प्रश्न महाजन आयोगाच्या अहवालाने सुटला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांनी आता या विषयावरून सीमा भागातील लोकांना भडकावणे थांबवले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. मानवतावाद आणि चांगल्याल कामाला कोणत्याही सीमा नसतात. त्यामुळे आता काहीं चांगले घडवण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहनही त्यांनी केले आहे. संजय राऊत यांनी हा विषय उपस्थित करून स्वताचीच अडचण करून घेतली आहे अशी टिपण्णीही त्यांनी केली.