नवी दिल्ली – लडाखच्या हिमालयीन प्रदेशात भारतीय पोलिसांच्या सुरक्षेविषयीचा अहवाल असे सांगतो की बीजिंगने या प्रदेशात लष्करी पायाभूत सुविधा वाढवल्यामुळे तेथे त्यांच्या प्रतिस्पर्धी सीमेवर भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये आणखी चकमकी होऊ शकतात. वर्ष 2020 मध्ये पश्चिम हिमालयातील लडाखमध्ये आशियाई दिग्गज देशांच्या सैन्यात चकमक झाली होती. तेव्हा किमान 24 सैनिक ठार झाले होते. परंतु लष्करी आणि राजनैतिक चर्चेनंतर हा तणाव कमी झाला.
डिसेंबरमध्ये पूर्वेकडील हिमालयात दोन्ही बाजूंमध्ये ताज्या संघर्षाला सुरुवात झाली होती. पण त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा ताजा अहवाल लडाख पोलिसांच्या नवीन, गोपनीय संशोधनाचा एक भाग आहे जो 20 ते 22 जानेवारी दरम्यान आयोजित उच्च पोलीस अधिकाऱ्यांच्या परिषदेत सादर केला गेल. या अहवालात असे म्हटले आहे की, सीमावर्ती भागात स्थानिक पोलिसांनी गोळा केलेल्या गुप्तचर आणि भारत-चीन लष्करी तणावाच्या अनेक वर्षांच्या पद्धतीवर आधारित आहे.
भारतीय सैन्याने टिप्पणीसाठी केलेल्या विनंतीला प्रतिसाद दिला नाही परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या परिषदेत सादर करण्यात आल्याने हे मूल्यांकन महत्त्वपूर्ण आहे. संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयांनी देखील टिप्पणीच्या विनंतीला प्रतिसाद दिला नाही. तसेच चिनी परराष्ट्र मंत्रालयाने टिप्पणीच्या विनंतीला प्रतिसाद दिला नाही.
चीनमधील देशांतर्गत हुकुमशाही आणि या प्रदेशातील त्यांचे आर्थिक हितसंबंध लक्षात घेता, चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी आपल्या लष्करी पायाभूत सुविधांची उभारणी करत राहील आणि चकमकीदेखील वारंवार घडत राहतील. आपण चकमकी आणि तणावाच्या पद्धतीचे विश्लेषण केल्यास, 2013-2014 पासून दर 2-3 वर्षांच्या अंतराने अशा चकमकींची तीव्रता वाढली आहे,असे अहवालात म्हटले आहे. भारत आणि चीनमध्ये 3,500 किमी (2,100 मैल) लांबीची सीमा आहे जी 1950 पासून विवादित आहे. त्यावरून 1962 मध्ये दोन्ही पक्षांमध्ये युद्ध झाले.