शिक्रापूर – वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांची समाधीस्थळ हे मोठे शक्तीपीठ आहे. हे शक्तीपीठ जगाच्या पाठीवर आणण्यासाठी यापूर्वी कोणी काय प्रयत्न केले, हे त्यांनी पहावे. प्रत्येक वेळी राजकारण आणून टीका करणे हे संकोचित मनोवृत्तीचे लक्षण असल्याचा टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना लगावला आहे.
श्रीक्षेत्र वढु बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या 333 व्या पुण्यतिथीनिमित्त खासदार डॉ. अमोल कोल्हे आले असता बोलत होते. ते म्हणाले, स्वराज्य रक्षक संभाजी मालिका सुरु करण्यापूर्वी मी येथे येऊन नतमस्तक झालो होतो. प्रत्येक स्मरणदिनाच्या दिवशी येथे येत असतो.
मालिका पूर्ण झाल्यानंतर देखील येथे येऊन नतमस्तक झालो होतो, ज्यांनी हे विधान केले असेल त्यांनी हे शक्तीपीठ जगाच्या पाठीवर पोहोचावे यासाठी या शक्तीपीठ साठी काही प्रयत्न केले का हे पाहिले पाहिजे, सध्या जे प्रयत्न घडत आहेत त्याचे कौतुक केले पाहिजे.
माझ्या शंभू भक्तीची परीक्षा मी त्यांना द्यावी इतके वाईट दिवस माझे अजून आलेले नाही असा टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना लावला आहे.