नवी दिल्ली: काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याविरूद्ध सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. मोदी आणि शहांविरुद्ध आचारसंहिता भंगाच्या विविध 9 तक्रारी दाखल आहेत. मात्र निवडणूक आयोगाने आतापर्यंत कोणताही निकाल दिला नसल्यामुळे काँग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेतली.
काँग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानंतर मोदी आणि शहांविरुद्ध दाखल असलेल्या तक्रारी 6 मे पूर्वी निकाली काढण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. काँग्रेसने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. निवडणूक आयोग भेदभाव करत असून मोदींना क्लीन चिट आणि राहुल गांधीना नोटीस देत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.