बीड – राज्यात मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला असून काही ठिकाणी घरं पाण्यात गेली आहेत. या पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचंही मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे.
बीड जिल्ह्यातील शिरूर (कासार) तालुक्यातील सावरगाव, बोरगावसह परिसरातील गावांना पावसाचा मोठा फटाका बसला असून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे पंचनामे करून मदत करण्याची मागणी येथील शेतकरी करीत आहेत.
राज्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. मराठवाड्यातील बीड, हिंगोली, जालन्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे.
बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. विशेषतः कपाशीचे मोठे नुकसान झाले असून पिकं वायाला गेली आहे. यामुळे याठिकाणी पंचनामे करून मदत करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.