उस्मानाबाद – पावसाळा आला की, नळदुर्ग किल्ल्यावरील पाणी महालावर बांधण्यात आलेला नर-मादी धबधबा पर्यटकांना खुणावत असतो. हे विहंगम दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी दरवर्षी पर्यटक उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेल्या नळदुर्ग किल्ल्यावर मोठ्या संख्येने गर्दी करतात. मात्र यंदा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नळदुर्ग किल्ला पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आला आहे. पाणी महलवरील नर-मादी या दोन्ही सांडव्यांमधून पाणी ओसंडून वाहत असताना पर्यटक मात्र निसर्गाचा हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यास मुकलेत. असं असलं तरी नर-मादी धबधब्याची ही दृश्य डिजिटल प्रभातच्या कॅमेऱ्यात कैद झाली असून प्रत्यक्षात शक्य नसलं तरी व्हिडिओद्वारे तुम्ही याचा आनंद नक्कीच लुटू शकता.