एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड यशस्वी झाले आणि भाजपच्या मदतीने शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यातील सर्व समीकरणे आता बदलायला सुरुवात झाली आहे. अशात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत देत राज्याच्या राजकरणात खळबळ उडवून दिली. काल रात्री उशिरा राष्ट्रवादीची एक बैठक पार पडली त्यावेळी पवारांनी शिंदे सरकार केव्हाही कोसळेल असे भाकीत वर्तवले.
शिंदे गटात सर्व आलबेल नाही. अंतर्गत नाराजी सुरूआहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील काही आमदारांना मंत्रिपद मिळेल पण अनेकांना मंत्रिपदाची संधी मिळणार नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील नाराजी वाढेल. यामुळे शिंदे सरकार कधीही कोसळू शकते, असं सूचक विधान पवारांनी केलं आहे.
भाजपचा मुख्यमंत्री न झाल्याने त्यांच्यात देखील मोठी नाराजी आहे याचा परिणाम शिंदे सरकारवर मोठ्या प्रमाणात होईल. त्यामुळे हे सरकार कोसळल्यानंतर विधानसभेची निवडणूक होऊ शकते म्हणून मध्यावधी निवडणुकीला तयार रहा असं देखील पवारांनी यावेळी म्हंटल आहे. तसेच आपलं सरकार नसलं म्हणून काय झालं आमदारांनी आपल्या कार्य क्षेत्रांमध्ये काम करत रहा अशा सूचना यावेळी पक्षनेत्याकडून आमदारांना देण्यात आल्या.