नवी दिल्ली : देशातील करोना संसर्ग हळूहळू वाढताना दिसत आहे. कारण देशात सलग चौथ्या दिवशी 20 20 हजारांच्या पुढे करोना बाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 20 हजार 528 नवीन करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 49 करोना रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
देशात गेल्या 24 तासांत 49 रुग्णांचा मृत्यू झाल्याने करोनाबळींचा एकूण आकडा 5 लाख 25 हजार 709 वर पोहोचला आहे. शनिवारी दिवसभरात 17 हजार 790 रुग्णांनी करोना संसर्गावर मात केली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 4 कोटी 30 लाख 81 हजार 441 जण करोनामुक्त झाले आहेत. सध्या देशातील सक्रिय करोना रुग्णांची संख्या 1 लाख 43 हजार 449 इतकी आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.33 टक्के आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.47 टक्के आहे.
COVID19 | India records 20,528 new cases & 49 deaths in the last 24 hours; Active caseload at 1,43,449
199.98 cr total vaccine doses administered so far under the nationwide vaccination drive. pic.twitter.com/gHFyDoOGAd
— ANI (@ANI) July 17, 2022
शनिवारी दिवसभरात देशात 25 लाख 59 हजार 840 करोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. देशव्यापी लसीकरणात 199 कोटींहून अधिक करोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत.
राज्यात 2 हजार 382 नव्या करोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर आठ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी 11 रूग्णांची वाढ झाली आहे. शुक्रवारी राज्यात दोन हजार 371 रूग्णांची नोंद झाली होती. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात दोन हजार 853 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत 78,53,661 रूग्ण करोनातून मुक्त झाले आहेत.