उरुळी कांचन -वाढत्या करोनामुळे समाजावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे समाजासाठी सढळ हाताने मदत करून चोवीस तास मदतीसाठी उपलब्ध रहा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायतीला उरुळी कांचन ग्रामविकास सोसायटीचे संस्थापक आबासाहेब कांचन यांच्या वतीने चक्रधर उद्योग समूहाच्या माध्यमातून संजय कांचन व पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य संतोष कांचन यांच्यावतीने स्वखर्चाने वैकुंठरथ उपलब्ध करून देण्यात आला आहे. या वैकुंठ रथाचे लोकार्पण विधान भवन पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आमदार अशोक पवार, जिल्हा नियोजन मंडळाचे संतोष कांचन, उपसरपंच संचिता कांचन, सदस्य भाऊसाहेब कांचन, उद्योजक अजिंक्य दुधाणे उपस्थित होते.