नवी दिल्ली – करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांसाठी बीसीसीआयकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमांचे पालन जर खेळाडू आणि क्रिकेटशी निगडीत असलेल्या व्यक्तींनी केले नाही, तर त्यांना स्पर्धेत सहभागी होता येणार नाही, असेही बीसीसीआयने सुचित केले आहे.
बीसीसीआयने प्रत्येक राज्य संघटनेला ही नियमावली वितरीत केली आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेपासून भारतातील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांना प्रारंभ होत आहे. त्यासाठी सामन्यांच्या ठिकाणी खेळाडूंना 2 जानेवारीला दाखल व्हावे लागणार असून त्यानंतर त्यांना सहा दिवसांच्या विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्याचबरोबर हॉटेलमध्ये उतरल्यानंतर त्यांची पहिल्या, तिसऱ्या आणि सहाव्या दिवशी करोनाची चाचणी होणार आहे. जर खेळाडू करोना चाचणी पॉझिटीव्ह आढळले नाहीत तरच त्यांना सराव करण्यात देण्यात येणार आहे.जर खेळाडूंना बायो बबल वातावरणाच्या बाहेर जायचे असेल, तर त्यांना डॉक्टरांची परवानगी घेणे बंधनकारक असेल. जर खेळाडू आणि संबंधित कोणत्याही व्यक्तीने नियम मोडले तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
सामन्यात खेळाताना चेंडूवर लाळ लावता येणार नाही.जर एखादा व्यक्ती बायो बबल वातावरणातील नसेल आणि सराव सुरु असताना त्याने जर चेंडूला हात लावला तर तो थेट खेळाडूंकडे देण्यात येणार नाही. खेळाडूंना हा चेंडू देण्यापूर्वी पंच त्याला सॅनिटाइझ करतील आणि त्यानंतरच तो सरावासाठी दिला जाईल.जिथे सामना खेळवला जाणार आहे त्या स्डेडियमबरोबरच, खेळाडूंचे हॉटेल, सरावाचे ठिकाण आणि प्रवास या सर्व गोष्टी बायोबबलमध्ये असतील.
बायोबबल वातावरण हे फक्त खेळाडूंसाठीच नसेल, तर प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक, सामनाधिकारी, समाचोलक या सर्वांना बायोबबलमध्ये राहणे बंधनकार असेल. करोनाचा धोका कमी असल्याने देशांतर्गत स्पर्धांना सुरुवात होत असून त्याचा प्रारंभ सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेने होणार आहे. ही स्पर्धा 10 ते 31 जानेवारी या कालावधीमध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी खेळाडूंना स्पर्धेच्या ठिकाणी 2 जानेवारीपर्यंत दाखल व्हायचे आहे. बीसीसीआयने स्पर्धेसाठी सहा केंद्र बनवली आहेत, या केंद्रांमध्ये खेळाडूंना 2 जानेवारीपर्यंत पोहोचायचे असून त्यानंतर ही स्पर्धा सुरु करण्यात येणार आहे.