मुंबई – करोनाचा धोका कायम असला तरीही बीसीसीआयने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनासाठी कंबर कसली आहे. देशातील ज्या राज्यांत तसेच शहरात करोनाचा धोका फारसा नाही, त्या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करता येईल का, यासाठी चाचपणी सुरू केली आहे.
करोनामुळे गेल्या आठ महिन्यांत देशांतर्गत क्रिकेटही ठप्प झाले होते. आता देशात काही ठिकाणी हा धोका कमी असल्याने मोसमाची सुरुवात सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेने येत्या जानेवारीपासून होणार आहे.
त्यानंतर पुढील वर्षीच्या आयपीएल स्पर्धेनंतर रणजी स्पर्धा होण्याबाबत बीसीसीआयने सर्व राज्यांकडून मते मागवली आहेत. बायोबबलसुरक्षेत येत्या 10 ते 31 जानेवारीदरम्यान सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धानिश्चित करण्यात आली असून सर्व राज्यांच्या मतांचा आढाला घेत रणजी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.