वेळ असेलतर मुख्यमंत्री साहेब आमच्या समस्या कडेही लक्ष द्या…!
आदिवासी पाड्यातील महिलांची मुख्यमंत्र्याकडे आर्त हाक
हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे
हिंगोली – राज्यभरात राष्ट्रीय महामार्गाचे जाळ पसरत असताना दुसरीकडे मात्र ग्रामीण भागात अद्यापही पूर्णपणे रस्ते न झाल्याचे दिसून येते. त्यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
आज हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी शहरापासून व राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या आठ किमी अंतरावर असलेल्या सोनवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जुनूना वस्ती मधील महिलेला प्रसूतीसाठी दुर्दैवी बैलगाडीतून रुग्णालय गाठावा लागल.तालुक्यातील जुनून वस्ती हि 40 वर्षा पासूनची जुनी वस्ती आहे या वस्तीत 28 घरे असून येथील लोकसंख्या 200च्या जवळपास आहे.
दि 08/ऑगस्ट रोजी एका बाळंतिनिला कळमनुरी येथून बैलगाडीतून रिमझिम पावसात घरी न्यावे लागले येथील बहुतांश नागरिक आपली उपजीविका शेती वरच भागवतात या आदिवासी पाड्यात अजूनही पक्की डांबरी रस्ते झाले नसल्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
आमदार,खासदार लोकप्रतिनिधी केवळ मते मागण्यासाठी येतात आमच्या समस्या अजूनही कायम असल्याची खंत येथील महिलांनी व्यक्त केली आहे. आतापर्यंत रस्ता दुरुस्तीसाठी या गावातील नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावां करून सुद्धा अद्याप पक्का रस्ता मिळाला नाहीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर असून ग्रामीण भागातील रस्त्याकडे देखील त्याने लक्ष द्यावं अशी आर्थ आहात या भागातील गावकऱ्यांनी केली आहे.यापूर्वी अनेक लोकप्रतिनिधींनी रस्ता बनवून देऊ अशी आश्वासने दिली होती मात्र ती आश्वासने हवेत विरल्याचे दिसते.