बारामती (प्रतिनिधी) | बारामती तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ६४ मेंढ्या व ५ शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. काळखैरेवाडी येथे एका घराची अंशतः पडझड झाली असल्याचे तहसीलदार विजय पाटील यांनी सांगितले आहे.
बारामती तालुक्यात अवकाळी पाऊस पडल्याने निर्माण झालेल्या गारव्यामुळे शेळ्या-मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. तालुक्यातील नऊ गावात ६९ शेळ्या-मेंढ्या मृत्युमुखी पडल्या.
काळखैरेवाडी येथे तीन मेंढ्या , कुतवळवाडी(१७), नारोळी (८), देऊळगाव रसाळ( १) मेंढी (२ )पिल्ले, पानसरे वाडी (९ ), चांदगुडे वाडी (२०) , वढाणे (४ )मेंढ्या (१) शेळी, तर झारगडवाडी येथे तीन शेळ्या मृत्युमुखी पडल्या.
याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे.बारामती तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबाग शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. द्राक्ष बागायतदार चिंतेत आहेत.