बारामती : महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमध्ये भाजपच्या वतीने ढोल बजाव महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवावी, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 50,000 जमा करावेत तसेच शेतकऱ्यांचा वीज पुरवठा बंद केल्याच्या निषेधार्थ आंदोलन छेडण्यात आले.
तसेच गृह मंत्री अनिल देशमुख यांचा पुतळा भिगवण चौकात जाळण्यात आला. त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने केली.