मुंबई – बराक ओबामा यांनी आपल्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ पुस्तकाची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. त्यांनी या पुस्तकात राजकीय प्रवासापासून ते खासगी गोष्टींपर्यंत अनेक गोष्टींवर ओबामा यांनी भाष्य केलं आहे. या पुस्तकात राहुल गांधी यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. राहुल गांधी हे ‘नर्व्हस’ आणि कमी योग्यतेचे नेते असल्याचं ओबामा यांनी म्हटलं आहे.
रामायण, महाभारत ऐकत बालपण गेले
तर यातच ओबामा यांनी असा दावा केला आहे की 26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतर माजी भारतीय पंतप्रधान मनमोहन सिंग पाकिस्तानविरूद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते. याच्यामुळे त्यांचे राजकीय नुकसान झाले.
“ओबामांचं आता काही खरं नाही, शिवसेना नाराज झाल्याने त्यांना झोप लागत नसेल”
त्यांनी पुढे लिहिले आहे कि, ‘मनमोहन सिंग यांना भीती होती की देशातील विरोधक भाजप मुस्लिमविरोधी भावना वाढवत आहेत. राजकीय पक्षांमधील कडवे वाद, विविध सशस्त्र फुटीरवादी चळवळी आणि भ्रष्टाचार घोटाळे असूनही आधुनिक भारताची कहाणी अनेक प्रकारे यशस्वी म्हणता येईल. ‘दरम्यान, यावरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे.