नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ इंडियाला चौथ्या तिमाहीत 252 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. अनुत्पादक मालमत्ता वाढल्यामुळे गेल्या वर्षी या तिमाहीत बॅंकेला 3969 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता. सरलेल्या वर्षात केंद्र सरकारने बॅंकेला 14724 कोटी रुपयांचे भांडवल दिलेले आहे.
बॅंकेने कर्जवसुली वाढविल्यामुळे बॅंकेचे ढोबळ एनपीए आता 15.84 टक्क्यांवर आले आहे. गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत ढोबळ एनपीए तब्बल 16.58 टक्के होते. निव्वळ एनपीए 8.26 टक्क्यावरून 5.61 टक्क्यावर आले आहे. त्यामुळे आगामी तिमाहीत बॅंकेचा नफा वाढण्याची शक्यता दिसून येऊ लागली आहे.