डब्लिन – डब्लिन येथील तिरंगी एकदिवसीय मालिकेतील पाचव्या क्रिकेट सामन्यात मुशफ़िकुर रहीम आणि सौम्य सरकार यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशने वेस्टइंडिजवर 5 गडी राखून विजय मिळविला आहे. बांगलादेशचा गोलंदाज मुस्ताफिजुर रहमान याला चांगल्या कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. या विजयासह बांगलादेशने तिरंगी क्रिकेट मालिकेच्या अंतिम फेरित प्रवेश केला आहे.
प्रथम फलंदाजी करताना वेस्टइंडिजने 50 षटकांत 9 बाद 247 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजकडून शाइ होपने सर्वाधिक 87 आणि जेसन होल्डरने 62 धावा केल्या. बांगलादेशकडून गोलंदजाीत मुस्ताफिजुर रहमानने सर्वाधिक 4 तर मशरफे मुर्तजाने 3 गडी बाद केले. तर प्रत्युत्तरात विजयासाठीचे 248 धावांचे लक्ष्य बांगलादेशने 46.1 षटकांत 5 गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले.
बांगलादेशकडून फलंदाजीत मुशफिकुर रहीमने सर्वाधिक 63 आणि सौम्य सरकारने 54 धावा केल्या. याशिवाय मोहम्मद मिथूनने 43 आणि महमुदुल्लाह 30 धावा केल्या. वेस्टइंडिजकडून ऐश्ले नर्सने सर्वाधिक 3 तर जेसन होल्डर आणि केमार रोचने प्रत्येकी 1 गडी बाद केला.
Bangladesh have secured a five-wicket win over West Indies!
Half-centuries from Soumya Sarkar and Mushfiqur Rahim were crucial in the chase of 248, and victory means that Bangladesh will feature in the tri-series final.
SCORECARD ⬇️ https://t.co/jSVx0ZbLdj pic.twitter.com/4mqXKgge0E
— ICC (@ICC) May 13, 2019
संक्षिप्त धावफलक :
वेस्टइंडीज:247/9(50 षटक)
-शाई होप 87,
-मुस्ताफिजुर रहमान 43/4
बांग्लादेश : 248/5 (46.1 षटक)
-मुशफिकुर रहीम 63
-एशले नर्स 53/3
दरम्यान, वेस्टइंडीज आणि बांगलादेश हे संघ आयर्लंड दौऱ्यावर असून आयर्लंड, बांगलादेश आणि वेस्ट इंडीजदरम्यान तिरंगी वनडे मालिका सुरू आहे. मालिकेतील सहावा सामना आयर्लंड आणि बांगलादेश यांच्यात बुधवारी होणार आहे. मात्र बांगलादेश आणि वेस्टइंडिज यांनी याआधीच अंतिम फेरीत प्रवेश केला असून अंतिम सामना शुक्रवारी (17 मे) ला होणार आहे.