पोशेफस्ट्रूम : भारत आणि बांगलादेश या संघाने उपांत्य फेरीत आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजय साकारला. त्यामुळे १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आज (रविवार ,९ फेब्रुवारी) दोन आशियाई संघात विजेतेपदाची लढत पाहायला मिळणार आहे.
भारत-बांगलादेश या सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार असून नाणेफेकीचा कौल हा बांगलादेशच्या बाजूने लागला आहे. बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
Bangladesh win the toss and opt to bowl!
Good decision? 🤔 #U19CWC | #INDvBAN | #FutureStars pic.twitter.com/kQGsKiSDPa
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) February 9, 2020
दरम्यान, १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारतीय संघाने सातव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे. भारताने तब्बल चार वेळा विजेतेपद पटकावले आहे. दुसरीकडे बांगलादेशने प्रथमच विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. भारताचे पारडे जरी जड असले तरी अंतिम फेरीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.