T20WorldCup – टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाला मोठा विजय साकारण्यात यश मिळाले. भारताने ४ गडी राखून पाकिस्तानला धूळ चारली. सामन्यात विराट कोहलीच्या फलंदाजीने सगळ्यांनाच वेड लावले. विराट ५३ चेंडूत ८२ धावा करून नाबाद राहिला आणि भारताच्या विजयचा हिरो ठरला. मात्र दुसरीकडे बांगलादेश संघाने टी-२० विश्वचषकातील सुपर-१२च्या दुसऱ्या गटातील गुणतालिकेत भारताला मागे टाकलं आहे.
संघ हरला पण कॅप्टन बाबर आझमने केले विराट कोहलीचे तोंड भरून कौतुक, म्हणाला….
विश्वचषकाचा १७ वा सामना नेदरलँड आणि बांगलादेश यांच्यात खेळला गेला. सोमवारी (२४ ऑक्टोबर) होबार्टमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात बांगलादेशने ९ धावांनी बाजी मारली. सामन्याच्या सुरुवातीला नेदरलँडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशने २० षटकांत ८ गडी गमावून १४४ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ २० षटकांत १३५ धावांवरच सर्वबाद झाला. बांगलादेशसाठी तस्किन अहमदने ४ षटकात २५ धावा देऊन ४ गडी बाद केले. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून पुरस्कार देण्यात आला.
बांगलादेश संघाने या विजयासह टी-२० विश्वचषकाची सुरुवात चांगली केली आहे. एव्हढेच नाही तर त्यांनी गुणतालिकेत भारताला देखील मागे टाकलं आहे. भारताने काल पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकल्यानंतर २ अंक मिळवून गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले होते. मात्र आज बांगलादेश संघाने नेदरलँड संघाचा पराभव करत गुणतालिकेत २ अंकांसह पहिल्या स्थानावर ताबा मिळवला आहे.
बांगलादेशने नेदरलँड संघावर मिळवत २ अंक आणि +०.४५० अशा नेट रनरेटने गुणतालिकेतील पहिले स्थान मिळवले आहे. तर दुसरीकडे भारताने काल पाकिस्तानवर विजय मिळवत २ अंक आणि +०.०५० अशा नेट रनरेटची कमाई केली होती. मात्र यामध्ये पहिले तर भारताचा नेट रनरेट हा बांगलादेशपेक्षा कमी आहे. याच कारणामुळे बांगलादेशने भारताला गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर ढकलले आहे. स्पर्धेत आणखी बरेच सामने खेळले जाणार आहेत. त्यामुळे गुणतालिकेतील संघांचे स्थान बदलत राहणार आहे.