ढाका : बांगलादेशच्या निर्मितीसाठी महत्वपूर्ण योगदान देणारे देशाचे माजी अध्यक्ष शेख मुजीब उर-रेहमान यांच्या १०० व्या जन्मदिनाचे औचित्य साधून दोन टी-२० सामने खेळविण्यात येत आहेत.
आशिया इलेव्हन व जागतिक इलेव्हन संघांत दोन टी-२० सामने होणार आहेत. या सामन्यांत भारतीय खेळाडूंना सहभागी होण्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) होकार कळविला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या दोन्ही सामन्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांचा दर्जा दिला आहे. मात्र हा निर्णय बदलण्यात आला व आता हे सामने बांगदेशातच होत आहेत. भारतीय संघातील जवळपास पाच खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहे.