लाहोर : सलामीवीर बाबर आझम आणि मोहम्मद हफीज यांच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने बांगलादेशवर ९ विकेटनी विजय मिळविला आहे. या विजयासह पाकिस्तानने तीन टी-२० क्रिकेट सामन्याच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. बाबर आझम सामन्याचा मानकरी ठरला.
Bangladesh lost the second T20I by 9 wickets.#BANvPAK pic.twitter.com/Qjjhc2DMVh
— Bangladesh Cricket (@BCBtigers) January 25, 2020
विजयासाठीचे १३७ धावांचे आव्हान पाकिस्तानने १ गडी गमावत १६.४ षटकात पूर्ण केले. पाकिस्तानकडून बाबर आझमने ४४ चेंडूत (७ चौकार व १ षटकार) नाबाद ६६ तर मोहम्मद हफीजने ४९ चेंडूत (९ चौकार व १ षटकार) नाबाद ६७ धावांची खेळी केली. अहसन अली शून्यावर बाद झाला. बांगलादेशकडून गोलंदाजीत शफीउल इस्लामने १ गडी बाद केला.
Bangladesh set a target of 137 in the second T20I.#BCB #BANvPAK pic.twitter.com/UmT4W1XhAc
— Bangladesh Cricket (@BCBtigers) January 25, 2020
तत्पूर्वी बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. बांगलादेशकडून तमीम इकबालने ५३ चेंडूत (७ चौकार व १ षटकार) सर्वाधिक ६५ धावांची खेळी केली तर महमूदुल्लाहने १२ आणि अफिफ होसैनने २१ धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद हसनैनने २ तर हारिस रौफ, शादाब खान आणि शाहीन अफरीदीने प्रत्येकी १ गडी बाद केला.