नवी दिल्ली : भारताने मलेशियामधून आयात होणाऱ्या पाम तेलाच्या आयातीवर बंदी घातली. मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी नागरिकत्व कायद्याबद्दल वक्तव केले होते. त्यावरून हि बंदी घेतल्याचे बोलले जात आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, जगातील खाद्यतेलांचा सर्वात मोठा खरेदीदार असलेल्या भारताने रिफाइंड पाम तेलाच्या आयातीवर बंदी घातली आहे. मलेशियातील सर्व व्यापाऱ्यांना पाम तेलाची आयात करण्यास थांबविले आहे. पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी दिलेल्या वक्तव्यामुळे भारताने हे पाऊल उचलले आहे.
पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा मुस्लिम विरोधी असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली होती. गेल्या पाच वर्षात भारत मलेशियन पाम तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. 2019 मध्ये 4.4 दशलक्ष टन पाम तेलाची भारताने खरेदी केली होती.
इंडोनेशिया नंतर मलेशिया पाम तेलाचा जगातील दुसर्या क्रमांकाचा उत्पादक आणि निर्यातदार आहे. भारताने घातलेल्या पाम तेलावरील बंदीमुळे मलेशियावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे तज्ञाचे मत आहे. मलेशियाच्या जीडीपीमध्ये पाम तेलाचा वाटा 3.8 टक्के आहे. पाम तेलावरील बंदीमुळे भारत आणि मलेशियातील व्यापारी संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे.