स्वदेशी जागरण मंचाची पंतप्रधानांकडे मागणी
नवी दिल्ली- “टिक टॉक’ आणि “हेलो’ या चीनी सोशल मिडीया ऍपवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित स्वदेशी जागरण मंचाने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन लिहीलेल्य पत्रामध्ये स्वदेशी जागरण मंचाचे सहसमन्वयक अश्वनी महाजन यांनी ही दोन्ही ऍप भारतातील युवकांना बिघडवत असल्याचा आरोप केला आहे.
“गेल्या काही आठवड्यांमध्ये “टिक् टॉक’वर सातत्याने देशविरोधी साहित्य उपलब्ध होत आहे. या ऍपवरील या देशविरोधी घटकांमुळे आपल्या समाजातील बांधणी नष्ट होऊ शकेल.’ असे महाजन यांनी म्हटले आहे. “हेलो’ हे ऍप अन्य सोशल मिडीया प्लॅटफॉर्मसाठी 11 हजार विडंबनात्मक राजकीय जाहिरातींसाठी 7 कोटी रुपये मोजत आहे. यापैकी काही जहिरातींमध्ये वरिष्ठ राज्कीय नेत्यांचे विकृत फोटो वापरले जातात. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या निवडणुकीच्यावेळीच निवडणुक आयोगाला ही बाब कळवली होती, असेही महाजन यांनी म्हटले आहे. चीनमधील काही घटक भारताचे सार्वभौमत्व आणि एकात्मता धोक्यात आणण्यासाठीच ही ऍप वापरली जात आहेत.
सध्या “प्ले स्टोअर’मधील अशा ऍपवर देखरेख करण्यासाठी भारतामध्ये कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे गृहमंत्रालयाने या ऍपवर बंदी आणायला पाहिजे. तसेच नव्या ऍपच्या परीक्षणास्ठी कायदा व्हायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.