मुंबई – भारत-चीन सीमेवरील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी चायनीज फूडवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. चायनीज हॉटेल्स व चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहा, असे आवाहनही आठवले यांनी केले.
चिनी लष्करासोबत निर्माण झालेल्या तणावात भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि 20 जवान शहीद झाले आहे. यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. चीनच्या या कृतीचा रामदास आठवलेंनी निषेध करत म्हणाले कि, भारताने चीनला बुद्ध दिला आहे युद्ध दिलेले नाही. पण चीनला युद्धाची खुमखुमी असेल तर भारतीय सैन्य चीनला कायमचा धडा शिकवतील. भारतात कोरोनाशी युद्ध सुरू आहे. त्यामुळे आता आम्हाला युद्ध नको बुद्ध हवा आहे. कोरोनाशी सुरू असलेले युद्ध जिंकणार आहोत आणि वेळ आल्यास चीनशीही युद्ध जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
भारताने चीनला बुद्ध दिला आहे युद्ध दिलेले नाही. पण चीन ला युद्धाची खुमखुमी असेल तर भारतीय सैन्य चीनला कायमचा धडा शिकवतील.भारतात कोरोना शी युद्ध सुरू आहे. त्यामुळे आता आम्हाला युद्ध नको बुद्ध हवा आहे. कोरोनाशी सुरू असलेले युद्ध जिंकणार आहोत आणि वेळ आल्यास चीनशीही युद्ध जिंकू. pic.twitter.com/eewqUA5fwB
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) June 17, 2020
तसेच चीन हे धोकेबाज राष्ट्र आहे.चीनच्या भारतातील वस्तूंवर बहिष्कार घातला पाहिजे. चिनी खाद्य पदार्थांवर ही बहिष्कार घातला पाहिजे. चायनीज फूडचे हॉटेल्स आणि चायनीज फूडवर भारतात बंदी घालण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी आज केले, असे आवाहनदेखील रामदास आठवले यांनी केले.