नागपूर – राज्यपालाच्या अभिभाषणावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढविला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार, असे वचन दिले होते. परंतु, कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या जीवावर शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवू हा तुमचा विचार होता काय, असा शिवसेनेला उद्देशून फडणवीस यांनी चिमटा काढला. यावर आज उद्धव ठाकरेंनीही फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले कि, सामना या चित्रपटात ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ असं एक गाणं हो गेले २५ वर्ष आम्ही पाठीवर ओझं घेऊन चाललो होतो. आता आम्ही ते ओझं उतरवलं आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. काँग्रेसच्या जीवावर शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवणार असा शब्द त्यांना दिला नव्हता. परंतु भाजपाची पालखीही कायमची वाहणार नाही, असं सांगितलं होतं. आम्ही काम करण्यासाठी एकत्र आलो आहोत. चहापेक्षा किटली जास्त गरम असते असं कोणीतरी म्हणालं होतं. पंरतु किटली पुसली जाणारी फडकीही आता गरम होऊ लागली आहेत, अशीही टीका भाजपवर केली आहे.