नवी दिल्ली : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी तिच्या एका वक्तव्यामुळे वादात अडकली आहे. साई पल्लवीने बॉलीवूड चित्रपट ‘द काश्मीर फाइल्स’मध्ये दाखवलेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्येच्या दृश्याची मॉब लिंचिंगशी तुलना केल्याने नवा वाद सुरु झाला. त्यामुळे आता वातावरण चांगलेच तापले असून साई पल्लवीच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
साई पल्लवीच्या वक्तव्यावर बजरंग दलाच्या नेत्यांनी हैद्राबादच्या सुलतान बाजार पोलिस ठाण्यात साई विरोधात तक्रार दाखल केली आहे. पल्लवीने काश्मीर फाइल्स चित्रपटावर भाष्य करताना गौ राक्षकांबद्दल देखील वक्तव्य केले होते. तिच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सांगितले की ते व्हिडीओ पाहतील आणि कायदेशीर अभिप्रायानंतर पुढील कारवाई करतील.
“For me violence is wrong form of communication. Mine is a neutral family where they only taught to be a good human being. The oppress, however, should be protected. I don’t know who’s right & who’s wrong. If you are a good human being, you don’t feel one is right.”
– #SaiPallavi pic.twitter.com/o6eOuKvd2G— Hate Detector 🔍 (@HateDetectors) June 14, 2022
”द काश्मीर फाईल्स या सिनेमात काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय आणि नरसंहार दाखवण्यात आला. धार्मिक वादावर बोलायचं झाल्यास गाईंची तस्करी करून घेऊन जाणाऱ्या मुस्लिम चालकाला मारण्यात आलं, जय श्रीराम या घोषणा देण्यात आल्या. काश्मीरमध्ये जे घडलं त्यात आणि मॉब लिंचिंगच्या घटनेत काय फरक आहे? दोन्ही घटना सारख्याच आहेत,” साई पल्लवीच्या या वक्तव्यावर वाद सुरु झाला आहे.