नवी दिल्ली – शेजारी देश पाकिस्तान सीमेवर रोज काही ना काही कारवाया करत असतो. मात्र सीमेनंतर आता पाकिस्तानने किनारपट्टी भागात भारताविरोधात कारवाई केली आहे. पाकिस्तानी नौदलाने रविवारी भारतीय नौकेवर गोळीबार केला. या गोळीबारात एका भारतीय मच्छिमाराचा मृत्यू झाला असून एक मच्छिमार जखमी झाला आहे. पाकिस्तानकडूनही अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची माहिती मच्छिमारांनी दिली आहे. ही घटना द्वारकाजवळील ओखा किनाऱ्यावर आज (7नोव्हेंबर) घडली.
– पाकिस्तानने याआधीही केला होता गोळीबार
याआधीही पाकिस्तानकडून अनेक मच्छिमारांना अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्येही पाकिस्तानी नौदलाने दोन बोटींवर गोळीबार केला होता. त्यावेळी बोटीवर 8 जण होते. या गोळीबारात उत्तर प्रदेशातील एक व्यक्ती जखमी झाला होता.
– शांतता भंग करण्याची पाकिस्तानची जुनी सवय
सलग दुस-या वर्षी पाकिस्तानी नौसैनिकांनी केलेल्या गोळीबारातून हे स्पष्ट होते की, पाकिस्तान जाणीवपूर्वक हा उद्धटपणा करत आहे. भारतीय सीमावर्ती भागात पाकिस्तानच्या अशा कारवाया नवीन नाहीत. या सर्व घटनांवरून स्पष्ट होतंय की, पाकिस्तानला ना स्वत:ला शांततेत राहायचंय ना आपल्या शेजारी देशांना शांततेत राहू द्यायचंय. मात्र पाकिस्तानच्या भारताबाबतच्या अशा वृत्तीला भारतीय लष्कर वेळोवेळी उत्तरे देत आहेत.