एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून भाजपसोबत मिळून राज्यात सरकार स्थापन केले. मात्र सरकारचा पूर्णपणे मंत्रिमंडळ विस्तार अद्यापही झाला नाही. यावरूनच शिंदे यांच्या गटातील अनेक नेते वेळोवेळी आपली खदखद बोलून दाखवत असल्याचे सातत्याने समोर येते. मात्र आता लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे अशी चर्चा रंगली आहे. यावर आता बच्चू कडू यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे.
अशात मंत्रिमंडळ विस्तारावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जेवणाचं आमंत्रण जेवल्या शिवाय खरं नसतं, अशी प्रतिक्रिया मंत्रिमंडळ विस्तारावर बच्चू कडू यांनी दिली आहे. घोडा मैदान जवळच आहे लढाई आहे. मंत्री नाही झालो तरी कामं करतोय. मंत्री झालो तर अधिक वेगाने काम करेन.पण मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे. विस्तार तातडीने होणं गरजेचं आहे. प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र पालकमंत्री भेटणं गरजेचं आहे ही जनतेची खरी मागणी आहे, असं बच्चू कडू म्हणाले आहे.