मुंबई – ठाकरे सरकारने केलेली दोन लाखांची कर्जमाफी ही बुजगावणी असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हंटले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.
निलेश राणे म्हणाले कि, बच्चू कडू तुमच्यासारखा वाघ ह्या खोटारड्या आणि शेंबड्या ठाकरे सरकार मध्ये शोभत नाही. तुम्ही शेतकऱ्यांचा आवाज आहात मग का शेतकऱ्यांशी गद्दारी करणाऱ्या लोकांसोबत राहता. राजीनामा देऊन वेगळे व्हा, असे सल्ला त्यांनी बच्चू कडूंना दिला आहे.
दरम्यान, राज्यमंत्री बच्चू कडू आपल्या राहुटी कार्यक्रमाअंतर्गत जनसामान्यांपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या सोडवत आहेत. ‘फैसला ऑन द स्पॉट’ करणारे आमदार म्हणून बच्चू कडू परिचित आहेत.