नवी दिल्ली : बाबरी मशिद पतन प्रकरणी सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायाधिशांनी सर्वोच्च न्यायालयाकडे वेळ वाढवून मागितला आहे. या प्रकरणात सोमवारी सुनावणी करण्यात आली. यावेळी विशेष न्यायाधिशांनी या प्रकरणी आणखी सहा महिन्यांचा न्यायालयाकडे वेळ मागितला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि अन्य नेते मंडळी या प्रकरणात आरोपी आहेत. दरम्यान, सोमवारी हे प्रकरण न्यायाधिश आर.एफ. नरिमन यांच्या पीठाकडे सुनावणीसाठी आले होते.
Ram Janmabhoomi-Babri Masjid matter: SC asked UP govt to apprise it by 19 July as to what are the rules®ulations when a judge hearing the entire case retires. Judges were informed that trial court judge was to retire on Sept 30 & he sought more time to complete the trial. pic.twitter.com/PUiaz3Pezr
— ANI (@ANI) July 15, 2019
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात विशेष न्यायाधिशांच्या विनंतीचा विचार करण्यात येणार असल्याचे आज झालेल्या सुनावणीत म्हटले आहे. तसेच न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला विशेष न्यायाधिशांचा कार्यकाल वाढवून देण्यात येतो का हे तपासून यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे म्हटले. कारण मे महिन्यात विशेष न्यायाधिशांनी सर्वोच्च न्यायालयास एक पत्र लिहिले होते त्यात त्यांनी 30 सप्टेंबर 2019 मध्ये आपण सेवानिवृत्त होणार असल्याचे म्हटले होते. त्यावर आज न्यायालयाने न्यायाधियांच्या कार्यकाळाविषयी कोणता उपाय करण्यात येतो का हे पहावे लागणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, 19 एप्रिल 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने रोज सुनावणी करून हे प्रकरण दोन वर्षात पुर्ण करण्याचे आदेश दिले होते.