जम्मू – करोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी अमरनाथ यात्रा 21 दिवसांऐवजी 14 दिवसच असेल. ही यात्रा 21 जुलैपासून सुरू होऊन 3 ऑगस्ट श्रावण पौर्णिमेला समाप्त होणार. या यात्रेसाठी अनेक अटी लावल्या आहेत.
14 वर्षांपेक्षा कमी आणि 55 वर्षांच्या पुढील लोकांना या यात्रेत सहभागी होता येणार नाही. स्वास्थ प्रमाणप्रत्रासोबतच करोना चाचणी करून त्याचे प्रमाणपत्रही सोबत जोडावे लागणार आहे.
भाविक बालटाल मार्गाने जाणार मात्र, किती भाविक जाणार याविषयी तूर्त सांगण्यात आलेले नाही. अशी माहिती श्री अमरनाथजी बोर्डच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. त्यांनी सांगितले की, गुंफेपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरील बर्फ हटवण्याचे काम सुरू केले आहे.
येथे पुन्हा एकदा भाविकांची करोना चाचणी होणार आहे. त्यानंतर त्यांना पुढील प्रवासासाठी परवानगी देण्यात येणार.