नवी दिल्ली – अयोध्येतील राम मंदिर प्रकरणी आज सुनावणी पूर्ण होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत सरन्यायाधिश रंजन गोगोई यांनी याबाबत मंगळवारी संकेत दिले होते. मंगळवारी या प्रकरणाच्या सुनावणीचा 39 वा दिवस होता. काल झालेल्या सुनावणीमध्ये सर्व पक्षकारांनी आपला युक्तीवाद आज पूर्ण करावा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
Supreme Court’s five-judge Constitution bench, headed by Chief Justice of India (CJI) Ranjan Gogoi, is hearing the Ram Mandir Babri Masjid land (Title) dispute case. CJI says, “Today is 39th day. Tomorrow is 40th day and last day of hearing in the case.” pic.twitter.com/DL7tDU7xiu
— ANI (@ANI) October 15, 2019
दरम्यान, या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. आज सर्व पक्षकार आपला युक्तीवाद पूर्ण करतील,अशी आशा असल्याची माहिती हिंदू महासभेचे वकील विष्णू जैन यांनी दिली. त्यानंतर मोल्डिंग ऑफ रिलीफवर चर्चा करण्यात येईल. तसंच बुधवारीच यावर चर्चा पूर्ण झाल्यास निकाल सुरक्षित ठेवला जाईल. परंतु या सर्व बाबी न्यायालयावर अवलंबून असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे नोव्हेंबर ४ किंवा ५ तारखेला या प्रकरणी निर्णय लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.