सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा दोन्ही पक्षकारांना दिल्या सूचना
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी पुन्हा एकदा अयोध्या प्रकरणी सुनावणी केली. यावेळी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या खंडपीठाने सर्व पक्षांनी आपापले युक्तिवाद मुदतीच्या आत पूर्ण केले पाहिजेत. आम्हाला निकाल लिहिण्यास चार आठवडे लागतील, त्यामुळे मुदत वाढवता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने 18 ऑक्टोबरपर्यंत खटला कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावा लागणार असल्याचे आजच्या सुनावणीत म्हटले आहे.
Ayodhya land dispute case: Supreme Court said that it cannot give an extra day after October 18 for parties to complete their submissions in the case. Today is the 32nd day of hearing in the case. pic.twitter.com/Bj7H67fXrO
— ANI (@ANI) September 26, 2019
गुरुवारी सुनावणी सुरू होताच सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी, या प्रकरणातील सुनावणी 18 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणे आवश्यक आहे, कारण त्यानंतरच्या चार आठवड्यांत आम्हाला निर्णय द्यावा लागेल. जर आपण हे करू शकलो तर हे चमत्काराच्या तुलनेत काहीच कमी नसल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले. दरम्यान, सरन्यायाधीश गोगोई 17 नोव्हेंबरला सेवानिवृत्त होत आहेत. या प्रकरणात 31 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण करावी लागेल असे यापूर्वी 18 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टीकरण दिले होते. दरम्यान, आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयात 31 दिवस सुनावणी झाली आहे.