बॉलीवूडमध्ये सध्या आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची जोडी सर्वाधिक पॉप्युलर आहे. ही जोडी आता दिर्घ काळानंतर पुन्हा एकदा “ब्रह्मास्त्र’मध्ये एकत्रित झळकणार आहे. या चित्रपटाचे डायरेक्शन अयान मुखर्जी असून या चित्रटाबाबत चाहत्यांमधील उत्सुकता खूपच वाढलेली आहे. या चित्रपटाची शुटिंग सध्या वाराणसी येथे सुरू आहे.
पौराणिक कथांवर आधारित असलेल्य या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि मौनी रॉयही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. याबाबत एका मुलाखतीत अयान यांनी चित्रपटातील एक खास गोष्ट सांगितली आहे. अयान म्हणाले, या चित्रपटात वाराणसीचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. हे तेच शहर आहे, जेथे चित्रपटातील सर्व कलाकार भेटतात आणि चित्रपटाला महत्त्वपूर्ण वळण मिळते.
यापूर्वी अयान यांनी सांगितले होते की, हा चित्रपट सध्याच्या परिस्थितीवर आधारित आहे. मात्र, यात भारतीय पौराणिक कथांचा आधार घेण्यात आला आहे. तसेच या चित्रपटात काम करण्यासाठी आलियाही खूप उत्साहित होती. कारण ती पहिल्यांदाच आपल्या आवडत्या अभिनेता रणबीर कपूरसोबत काम करत आहे.