हडपसर (प्रतिनिधी) : निराधारांना आधार देण्याचे कार्य मासिक अनुदान देऊन शासन करीत असते. यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. विविध योजनेतील लाभार्थ्यांची निवड करण्याची जबाबदारी ही संजय गांधी निराधार योजना समितीकडे असते. या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना घेता यावा यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना तहसीलदार यांनी विभागवार शिबिरांचे आयोजन करावे,अशी मागणी हवेली तालुका अध्यक्ष विठ्ठल विचारे पाटील यांनी केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे काम गेली काही महिने मंदावले आहे. या योजनेंतर्गत पात्र असलेल्या नागरिकांचे अर्ज मंजूर करण्यासाठी शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना समिती नियुक्त करण्यात आली आहे. त्याची नुकतीच एक बैठक ही झाली आहे.
“या योजनेची जास्तीत जास्त गरजू लोकांना माहिती मिळावी,तसेच पात्र उमेदवार यांना तत्काळ लाभ घेता यावा यासाठी कोरोनाचे सर्व नियम पाळून विभागवार शिबिरांचे आयोजन करण्यात यावे.
-विठ्ठल विचारे पाटील (अध्यक्ष,संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती, हवेली तालुका)
परंतु अपेक्षित असे काम सुरू झाले नाही. त्यामुळे अनेक निराधारांना अद्यापही शासनाचा आधार मिळू शकलेला नाही. तरी तहसीलदार यांनी याची तातडीने दखल घेत विभागवार शिबिरांचे आयोजन करावे जेणेकरून गरीब, विधवा, दिव्यांग व अनेक उपेक्षितांना न्याय मिळू शकेल.