नवी दिल्ली – देशभर खळबळ उडावणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणात फाशी ठोठावलेल्या मुकेश या आरोपींची दया यचिका गृहमंत्रालयाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविली आहे. या पार्श्वभामीवर निर्भयाची आई आशादेवी यांनी राजकीय पक्षांवर मोठा आरोप केला आहे.
आशादेवी यांनी म्हंटले कि, आम्हाला न्याय मिळाला नसून सरकारला आमच्या वेदना दिसत नाही. प्रत्येक जण आपापली राजकीय भाकरी भाजण्याचा प्रयत्न करत आहे. दोषींना फाशी देण्यास टाळाटाळ केली जात असून यामागे षडयंत्र आहे. मी आम्हाला मोहरा बनविण्यात आले असून नारेबाजी आणि तिरंगा रॅली करणारे हेच लोक आता मृत्यूचा खेळ करत आहेत, असा आरोप केला जात आहे.
#WATCH Asha Devi, mother of 2012 Delhi gang-rape victim: Till now, I never talked about politics, but now I want to say that those people who held protests on streets in 2012, today the same people are only playing with my daughter’s death for political gains. pic.twitter.com/FvaC89TwKI
— ANI (@ANI) January 17, 2020
तसेच, बहुत हुआ नरी पे वार, अब कि पार मोदी सरकार, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली दिली होती. जर तुम्ही तिहेरी तलाक कायद्यात सुधारणा करू शकता तर फाशीच्या कायद्यातही सुधारणा करून चारही आरोपीना फासावर लटकवा आणि आम्ही जनतेची सुरक्षा करू शकतो हे जनतेला दाखवून द्या, अशी मागणी आशादेवी यांनी केली आहे.