मागील अनेक महिन्यांपासून करोना संक्रमणामुळे शाळा-महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे बच्चेकंपनी घरातच राहून ऑनलाईन शिक्षण घेताहेत. मात्र , या कालावधीत मुलांचे वजन वाढत असल्याची समस्या सर्वत्र दिसून येत आहे.
यामागे शाळा आणि पर्यायाने बाहेर खेळणे-फिरणे बंद असल्याचे मुख्य कारण असले तरी काही इतर कारणेही दिसून येतात. जसे की, कुटुंबातील अन्य सदस्यांची खाण्याबाबतचा अति आग्रह, भावंडांचे अनुकरण, अभ्यासाचे टेन्शन आणि दबाव इत्यादीमुळे मुलांमध्ये वजन वाढताना दिसत आहे
या सर्व कारणांमुळे जवळजवळ 1/3 मुले किशोरवयातच लठ्ठ होतात. तर 70 टक्के लठ्ठ मुले मोठी झाल्यावर जाड / जास्त वजन असलेले प्रौढ होण्याची शक्यता असते. जगात मागील 30 वर्षांपासून मुलांमध्ये बालपणातील लठ्ठपणा वाढत असल्याने हृदयरोग, मधुमेह, स्ट्रोक आणि कर्करोगाचा धोका वाढला असल्याचे एका अभ्यासानंतर समोर आले आहे. विकसनशील जगातील 2/3 किशोरवयीन मुले दिवसभर कमीतकमी एक सोडा किंवा तत्सम गोड पेय पितात.
या समस्येवर वेळीच आळा घालणे शक्य आहे. यासाठी मुलांसोबतच पालकांनाही मेहनत घ्यावी लागेल.
– शक्य असेल तर दिवसातून एकदा मुलांना खायला द्या.
– अन्नामध्ये संपूर्ण धान्य, फळे आणि भाज्या जास्त प्रमाणात ठेवा.
– मुलांना सक्रिय बनवा.
– टीव्ही कमी वेळ पहायला द्या.
– मुलांना दिवसभरात 60 मिनिटे शारीरिक व्यायाम करायला लावा.
– सूर्यनमस्कार तसेच सोपी योगासनेदेखील करायला लावा.
– मुलांना सूर्यप्रकाश, बाग, धूळ, सायकल, धावणे आणि खेळाचा आनंद घेण्यास परवानगी द्या.