पुणे – पैसा कमावला म्हणजे करियर झालं असं नाही, या सगळ्या करियर मध्ये आपण लोकांसाठी किंवा देशासाठी काय केलं?, त्यामुळे कोणाला मदत झाली आहे का?, याचे उत्तर होकारार्थी आल्यास तुमचं करियर झाले, असे समजावे. यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी पैशाने विकत घेता येत नाही, असा धडा माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी दिला.
येथील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या शतकोत्तर हीरक महोत्सव वर्षानिमित्त अविनाश धर्माधिकारी यांची व्याख्यानमालेत ‘व्यक्तिमत्त्व आणि करियर त्यातून देशसेवा’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजू सहस्त्रबुद्धे , निवृत्त एअर मार्शल भुषण गोखले, डाॅ. भारत वनकटे उपस्थित होते.
देशसेवा कशी केली पाहिजे, व्यक्तिमत्त्व कसं असावं, सावरकरांनी देशसेवेसाठी काय केलं या सगळ्या मुद्यांवर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्यात स्व ची ओळख, मेंदू शाबूत आहे तर प्रत्येक जण बुद्धिमान, प्रत्येक जण वेगळ्या क्षेत्रात कामगिरी बजावतात, स्वाध्याय कौशल्य, दोन भाषेवर प्रभुत्व, तंत्रज्ञान, नियमित योग यांचा समावेश होता.