अहमदनगर : राज्यात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. त्यातच राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यातच अहमदनगर जिल्ह्यात पहिल्या दोन तासात सरासरी मतदान झाल्याचे समोर आले आहे.
पावसामुळे राज्यातील मतदानावर परिणाम होत आहे. त्यात अहमदनगर जिल्ह्यात पहिल्या दोन तासात सरासरी मतदान झाले. यावेळी जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे, पोपटराव पवार,जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मतदान केले. तसेच पालकमंत्री राम शिंदे, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह विविध मान्यवरांनी मतदानाचा हक्क बजावला.
सकाळी 7 ते 9
नेवासा : 7.4 टक्के
कोपरगाव : 4.76 टक्के
संगमनेर : 7.94 टक्के
कर्जत-जामखेड : 6.9 टक्के
शिर्डी : 4.21 टक्के
राहुरी :7 टक्के
श्रीगोंदा : 6.13 टक्के