नवी दिल्ली- मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करुन जीएसटी भरणा करणाऱ्या वाहन क्षेत्राला आत्मनिर्भर भारत योजनेत काहीच मिळाले नाही. याबद्दल वाहन उत्पादकांनी नाराजी व्यक्त केली आहे. लॉक डाऊनचा वाहन वितरकांवरही परिणाम झाला असून त्यांचा लघु उद्योगात समावेश केल्यास त्यांना लघुउद्योजकांना मिळणाऱ्या सवलती मिळू शकतील असे वाहन उत्पादकांनी म्हटले आहे.
लोक डाऊन मुळे वाहन वितरण करणाऱ्या वितरकांची परिस्थिती खराब झाली आहे यांच्याकडे खेळते भांडवल नाही कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवणे अवघड झाल्यास त्यामुळे या क्षेत्राचा उद्योगात समावेश केल्यास लघुउद्योगांना मिळणाऱ्या सवलती वितरकांना मिळू शकतील असे वाहन उत्पादकांची संघटना असलेल्या आमचे अध्यक्ष राजन वढेरा यांनी सांगितले.
सध्याच्या परिस्थितीत वाहनावरील जीएसटी 28 टक्क्यांवरून 18% करावा असे सूचना आम्ही वेळोवेळी केंद्र सरकारला केले होते ही सवलत मर्यादित काळासाठी देण्याची गरज आहे मात्र यावर आत्मनिर्भर भारत योजनेत भाष्य करण्यात आलेले नाही यासंदर्भात आम्ही पाठपुरावा करणार आहोत असे ते म्हणाले विविध विश्लेषण करणाऱ्या संस्थांनी या वर्षाचा विकासदर 0.1 टक्क्यापर्यंत कमी होण्याची शक्यता आहे असे म्हटले आहे असे झाले तर वाहन विक्री 22 ते 35 टक्क्यांनी कमी होईल या क्षेत्रात तीन कोटी 70 लाख लोक काम करतात तर एकूण जीएसटी संकलनात त्याचा वाटा पंधरा टक्के आहे मात्र असे असूनही या क्षेत्राकडे दुर्लक्ष झाले असल्याचे त्यांनी सांगितले.