सिडनी – स्टीव्ह स्मिथ, मार्नस लेबूशेन व कॅमेरुन ग्रीन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव 6 बाद 312 धावांवर घोषित केला व भारतासमोर विजयासाठी 407 धावा करण्याचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने चौथ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात 2 बाद 98 धावा केल्या असून त्यांना विजयासाठी आणखी 309 धावांची गरज आहे.
भारताचे सलामीचे फलंदाज रोहित शर्मा 52 तर शुभमन गील 31 धावा काढून माघारी परतले आहेत. सध्या खेळपट्टीवर अंजिक्य रहाणे 4 तर पूजारा 9 धावांवर टिकून आहेत. अद्याप 309 धावांची गरज असून भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांच्यावरच आता पुर्ण मदार आहे.
हिटमॅन रोहित शर्माचे अरधशतक व शुभमन गीलच्या उपयुक्त खेळी खेळीनंतरही भारतीय संघासमोर यजमान ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पराभव टाळण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताने दुसऱ्या डावात 2 बाद 98 धावा केल्या असून त्यांना विजयासाठी आणखी 309 धावांची गरज आहे.
ऑस्ट्रेलियाला सामना विजयासाठी 8 विकेटची आवश्यकता असून हा सामना जिंकून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स कमिन्स यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला आहे.
🏏 STUMPS in Sydney!
Three wonderful sessions for Australia. Can India battle it out on the final day?#AUSvIND SCORECARD ▶️ https://t.co/Zuk24dsH1t pic.twitter.com/8EISzpB62l
— ICC (@ICC) January 10, 2021
संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 338. भारत पहिला डाव – 244. ऑस्ट्रेलिया दुसरा डाव – 87 षटकांत 6 बाद 312 घोषित. (कॅमेरून ग्रीन 84, स्टिव्ह स्मिथ 81, मार्नस लेबूशेन 73, टीम पेनी नाबाद 39, नवदीप सैनी 2-54, रवीचंद्रन अश्विन 2-95, जसप्रीत बुमराह 1-68, महंमद सिराज 1-90). भारत दुसरा डाव – 34 षटकांत 2 बाद 98 धावा. (रोहित शर्मा 52, शुभमन गील 31, चेतेश्वर पुजारा खेळत आहे 9, अजिंक्य रहाणे खेळत आहे 4, जोश हेजलवूड 1-11, पॅट कमिन्स 1-25).